Posts

भारती विद्यापीठाचे लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय आणि उद्यानविद्या महाविद्यालयाच्या वतीने जागतिक नेत्रदिना निमित्त नेत्रचिकित्सा शिबिर आणि नेत्रदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

Image
भारती विद्यापीठाचे लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय आणि उद्यानविद्या महाविद्यालय कडेगाव जि. सांगली येथे बुधवार दिनांक 10 जून 2026 रोजी जागतिक नेत्रदिन निमित्त  नेत्रचिकित्सा शिबिर आणि नेत्रदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमास भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालय सांगली येथील  नेत्रतज्ञ आणि मेडिकल टीम उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मरणोत्तर नेत्रदान संकल्प फॉर्म भरून जमा केले आणि  प्रतिज्ञा घेतली. तज्ञ डॉक्टर डॉ. प्रवीण हंकारे यांनी नेत्रदानाचा उद्देश लोकांना मृत्यूनंतर त्यांचे नियंत्रण नेत्रदान करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि अंधत्वावर मात करून दृष्टीहीन व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणे हा आहे हे विशद केले, तसेच यासाठी कोणत्याही वयाची लिंगाची किंवा रक्तगटाची व्यक्ती नेत्रदान करू शकते अगदी चष्मा असलेली मधुमेह किंवा रक्तदाब असलेले रुग्णही डोळे दान करू शकतात आणि डॉ. कौस्तुभ पाटील यांनी नेत्रदानाचे महत्त्व, तसेच नेत्रदांना विशेष सविस्तर माहिती दिली नेत्रदान कोण करू शकते त्याची प्रक्रिया कधी व कशी होत...

कडेगाव येथील ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या श्रीराम मंदिरात श्रीमद् भागवत महपुराण कथा सप्ताहाचे आयोजन: देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष प्रा.दिपक कुलकर्णी.

Image
कडेगाव येथील श्रीराम मंदिरात अधिक जेष्ठ शुll एकादशी मंगळवार दि 26/05/2026 पासुन श्रीमद् भागवत महापुराण कथा सप्ताह प्रारंभ होत आहे व सांगता अधिक जेष्ठ कृll प्रतिपदा  पर्यंत दररोज सायंकाळी 4ते8 सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष प्रा दिपक कुलकर्णी यांनी सांगीतले.या भागवत महपुराण सप्ताह कथानिरूपणकार ह.भ.प.सौ.प्राची व्यास डोंबिवली  मुंबई तर संगितसाथ हार्मोनियम श्री अशोकराव कुलकर्णी,तबला साथ श्री रामभाऊ शिंदे आहेत.या सात दिवस चालणाऱ्या भागवत महापुराण सप्ताहात मंगळवार दि 26/05/2026 रोजी सकळी 8.30 ते 10.30 या वेळेत श्रीमद् भागवत ग्रंथ दिंडी,ग्रंथ पूजा,श्रीकृष्ण पुजा,तुळशी पुजा वेदसेवक श्री शैलेश कुलकर्णी गुरूजी हे करणार आहेत.या शिवाय भागवत महात्म्य कथा सायंकाळी 4 ते 8 यावेळेत सांगण्यात येणार आहे अशी माहीती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रा.दिपक कुलकर्णी यांनी दिली.चहापान सेवेची जबाबदारी देवस्थान ट्रस्टचे विद्यमान सदस्य,वसंत इनामदार,रमेश शिराळकर,वैभव रणभोर,यांच्या सह माजी पोलीस निरीक्षक तानाजीराव भोसले,गोकुळ ज्वेलर्स,व देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष श्रीकां...

अजित शेखर यादव व राजाराम विठ्ठल यादव सर्व परिवाराकडून युवानेते संग्रामसिह देशमुख यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Image
पलुस कडेगाव विधानसभा मतदार संघाचे निवडणुक प्रमुख,सांगली जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे   विद्यमान संचालक युवा नेते संग्रामसिंह देशमुख यांना अजित शेखर यादव व राजाराम विठ्ठल यादव व सहकुटुंब सहपरिवार( दिंडी वाडा) व कडेपुर येथील ग्रामस्थ यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

संग्रामसिंह देशमुख यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा ..

Image
कडेपूर /कडेगाव : प्रतिनिधी.                  भाजपाचे पलूस-कडेगाव विधानसभा प्रमुख सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह संपतराव देशमुख (भाऊ) यांचा कडेपूर येथील राजलक्ष्मी मल्टीपर्पज हॉल या ठिकाणी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह  एकनाथ शिंदे, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन,माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार श्रीकांत शिंदे, माजी खासदार संजय काका पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सत्यजित देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, माझी राज्यमंत्री सदाभाऊ खोत,आमदार विक्रांत पाटील,यांच्यासह राज्यातील व जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या.              सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह संपतराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी पत्नी सौ.अपर्णा देशमुख, कन्या स्वरा देशमुख यांच्य...

पलुस कडेगाव विधानसभा मतदार संघाचे निवडणुक प्रमुख,सांगली जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक युवा नेते संग्रामसिंह देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!शुभेच्छुक :ग्रीन पॉवर शुगर्स लिमिटेड तालुका खटाव जिल्हा सातारा.

Image
पलुस कडेगाव विधानसभा मतदार संघाचे निवडणुक प्रमुख,सांगली जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे   विद्यमान संचालक युवा नेते संग्रामसिंह देशमुख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! शुभेच्छुक : ग्रीन पॉवर शुगर्स लिमिटेड तालुका खटाव जिल्हा सातारा.

26जानेवारी रोजी जन्मलेल्या बाळाचा नामकरण विधी मोठ्या धुमधडाक्यात संपन्न...!

Image
व्यास आणि जोशी कुटुंबातील चिमुकल्या पाहुण्यांच्याआगमना निमित्त शिराळा येथील लकी मल्टिपर्पज हॉल मध्ये आयोजित नामकरणसोहळा (बारशे)अत्यंत उत्साहात व तेवढ्याच दिमाखात पार पडला या अभुतपुर्व आनंदाक्षणी बाळाचे नाव सर्व मान्यवर पाहुण्याचे समोर अभिषेक व सौ.प्रतिक्षा व्यास जोशी यांनी जाहीर केले.हिंदू संस्कृती नुसार,बाळाच्या आजी सौ.ज्योती,सौ.राणी,सौ.रेखा कुलकर्णी,वर्षा व्यास,कवी सुधावंशु यांच्या बहीणाबाई यांनी सुरेल आवाजात पाळणा म्हणला.बाळाची आत्त्या ईश्वरी व बाळाची मावशी मनाली यांनी बाळाचे नाव नित्त्या ठेवल्याचे बाळाचे वडील अभिषेक व सौ.प्रतिक्षा यांनी बाळाचे नाव नित्या प्रतिक्षा अभिषेक व्यास असे जाहीर केले.  यावेळी बाळाची आजी सौ.रसिका अजोबा रविंद्र जोशी व सौ.निलम,हेमंत व्यास, दिपक जोशी,रमेश जोशी,विनोद गोसावी,विश्वास व्यास,राजेश कराडकर,संजय गोलिवडेकर,अरूण कडवेकर,यांच्या उपस्थितीत पारंपारीक हिंदू पध्दतीने मोठ्या थाटामाट संपन्न झाला. पाहुण्याचे स्वागत बाळाचे मामा ओंकार,दर्शन व पवन जोशी यांनी जोरदार पध्दतीने केले पाळणा सजावट व स्टेज सजावट बाळाची माम...

क्रांतिसिंह नाना पाटील पहिले साहित्य संमेलन महाराष्ट्रत प्रसिद्ध होणार.प्रा. डी. ए‌. माने.

Image
सांगली /कडेगाव :- भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी खूप मोलाचे कार्य केलं ते थोर सेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावाचं पहिले साहित्य संमेलन सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे येतील प्रसिद्ध सागरेश्वर मंदिरात परिसरात हॉल मध्ये आज अतिशय उसामध्ये संपन्न झालं . सुरुवातीला सागर शह परिसरात असणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास सर्व मान्यवरांनी पुष्पगुच्छ अर्पण करून संमेलनाची सुरुवात केली. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष थोर विचारवंत ,प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डी. एम. माने होते .ते म्हणाले क्रांतिसिंह नाना पाटील यांचे कार्य आणि यशवंतराव चव्हाण यांचे कार्य या दोन्हीही महापुरुषांना मी वंदन करतो.त्यांच्या कार्याचा संपूर्ण महाराष्ट्राला, देशाला अभिमान आहे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावाने सुरू होणारे हे साहित्य संमेलन महाराष्ट्रभर प्रसिद्ध होईल . हे साहित्य संमेलन म्हणजे गंगोत्रीचा विस्तार निश्चितच गंगासागरा कडे होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.  यावेळी त्यांनी या साहित्य संमेलनामध्ये संत ज्ञानेश्वरापासून आजपर्यंत सर्व संतांच्या कामगिरीबद्दल साहित्य बद्दल मा...